बोईसर, वाणगाव, शिगाव, दाभोण, रणकोल सह शेजारील परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे मागील, सप्टेंबर व आताच्या ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या पावसाने धान, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले; परंतु, शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात र आहे.
शेतकऱ्यांनी यंदा नव्या उमेदीने कर्ज काढून बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी केली. उभे पिके शेतात डोलत असताना शेतकऱ्यांवर इ अतिवृष्टीमुळे व नंतर परतीच्या पावसाचे अस्मानी संकट कोसळले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या कृषी व महसूल विभागाने पंचनामेही अद्याप केली नसल्याचे शेतकरी वर्गा कडून सांगण्यात आले.
दिवाळीपूर्वी मदत मिळेल, अशी आशा शेतकरी मध्ये होती; परंतु शासनाकडून दिवाळी तोंडावर असताना देखील पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नसल्याची खंतही शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात असून अजूनही शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच आहे.
शासनाने तात्काळ याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोट –
सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस व आता ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेला परतीच्या पावसाने हथा तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी.
विजय घाटाळ
शेतकरी
